राज्यात लवकरच २० हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार

 

राज्यात लवकरच २० हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार


पोलीस दलासाठी दोन वर्षांत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात लवकरच २० हजार पोलिसांची भरती करण्यात येणार असून त्यापैकी आठ हजार पोलीस भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द झाली आहे, तर आणखी बारा हजार पोलीस भरतीसाठी जाहिरात लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे. सायबर सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधताना सायबर गुन्हे तत्काळ उघडकीस यावेत यासाठी काही सुधारणा केल्या जातील अशी देखील माहिती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पोलिस विभागातील भरतीबाबत या पूर्वी सात ते आठ हजार पदांच्या भरतीबाबत एक जाहीरात काढण्यात आली असून आता आणखी १२ हजार पदांसाठीची जाहीरात लवकरात लवकर काढण्यात येईल. या भरतीमुळे पोलिस दलाला चांगली मदत होणार असून या भरतीसाठी लकरता लवकर कार्यवाही करण्यात येणार असल्याचं यावेळी दवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


सविस्तर बातमी पाहा


Post a Comment

0 Comments